गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

अंधार व अवकाश...........!

अंधार, प्रकाशाचा एक विरुद्ध अर्थी शब्द, जीवनातील सगळ्यात नाकारार्थी वाटणारी गोष्ट. भयावह, न आवडणारी, जिथे प्रगती थांबते, वा सर्वांचा शेवट वाटणारी..... किवा नव्या सुरुवाती पूर्वीची ...

आपण ज्या गोष्टी पाहतो त्या सार्‍या या निसर्ग नियमानुसार आचरण करत असतात. सूर्य दररोज उगवतो व मावळतो, पृथ्वी व सर्व ग्रह, तारे आपला मार्ग आक्रमित असतात... ही कोणती शक्ति आहे याचा अजुन तरी कोणीही शोध लावला नाही. विच फोर्स ड्राइव ऑल ऑफ देम अँड फ्रॉम व्हेर इट प्रोड्यूस्ड इटसेल्फ....

माझी छोटीसी तर्क बुद्धी मला अस सांगतेय की विश्वाचा जन्म होण्या अगोदर सगळीकडे फक्त अंधार व मुक्त मोकळे अवकाश यांचेच अस्तित्व असेल. आणि मला वाटत की खरी ईश्वरी शक्ति या अंधारातच समावलेली असेल व ती सर्व अवकाशातही व्याप्त असु शकेल....

आता हेच बघा जेव्हा आपण दिवसभर खूप कष्ट करून जेव्हा रात्री गाढ झोपी जातो तेव्हा पुढच्या दिवशी लागणारी उर्जा वा शक्ति ही कालच्या अंधारातच तयार झालेली असते ना...

आणि मुख्य म्हणजे 'अंधार व अवकाश' तयार करण्यासाठी दुसर्‍या कोणत्याही नैसर्गिग वा कृत्रिम गोष्टीची गरज भासत नाही .......................!

वी आर वेरी डिमांडिंग नाउ अ डेज़..

रंगीबेरंगी - लहान मोठे, निरनिराळ्या आकाराचे फुगे...

एखाद्या चिमुकल्या बाळाने आपल्या इवलाश्या मिठीत ते साठवण्याचा प्रयत्न चालवलाय..
त्याला आजुन निराळ्या रंगाचे फुगे हवे आहेत.. वेगळ्या डिज़ाइन चे, आणखी नव्या मोहक रंगाचे... पण पण त्याच्या त्या छोट्या कवेत आणखी किती फुगे बसणार त्यालाही काही मर्यादा आसणार ना... जरी त्याने आणखी प्रयत्नाने काही फुगे जास्त घेतलेच तर त्याला आधीचे फुगे सांभाळण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागेल ..व त्या प्रयत्नात सध्या हातात असलेल्या फुग्यामधून जो आनंद मिळवायचा आहे त्याकडेही नकळतच दुर्लक्ष होणार ना....

आताही या चिमुकल्या बाळसारखीच आपली अवस्था झाली का हो ..... आपल्या सर्वांची.......
आजुन हव, हे पण पायजे, ते पण पायजे, आसच पायजे, तस नको, मागण्यांची साखळी न संपणारी आहेच..

आसुदे की मग

वी आर वेरी डिमांडिंग नाउ अ डेज़ ...

मग काय करायाच.......................................(फुगेच फोडू या की........ इट्स सो सिंपल )

अनुभव ......

बहुतेक हेच जीवनातील सार ( एक्सट्रॅक्ट ) असावेत.

मानवी जीवनात तृप्ती मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे, निरनिराळ्या उत्कट अनुभवांचा मनसोक्त घेतलेला आस्वाद हाच होय.

तो कोणताही असुदे, सुखद, दुखद, रोमांचक, पलपुटे पनाचा, बे-डर पनाचा , मनाचा दिल्दार पणा दाखविण्याचा, चार चौघात मिरवण्याचा, कोणावर तरी प्रेमाचा वर्षाव करण्याचा अथवा कोणालातरी आश‍चर्याचा सुखद धक्का देण्याचा, किंवा कुणाच्या तरी आठवणीत स्वत: ला विसरून जाण्याचा, वा बेभानपणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा....

अनुभवच मन पटलावर कोरून राहीले जातात ... व आपला खरा गुरू म्हणून मार्गदर्शन ही करत असतात.

निरनिराळ्या अनुभवांची श्रीमंती हे जीवन खूपच समृद्ध करते, धैर्याचे बळ निर्माण करते. आपल खर रूप दुसर्‍याणा दाखविण्याची हिंमत देते. मनातील अनामिक भीती काढून, खरा आत्मविश्वास देऊन जाते.

मग आपल जीवन हे मिटलेली कली न राहता, हसणार पूर्ण उमललेल फुलच बनलेल असेल.

लाइफ ईज़ ग्रेट .......

लाइफ ईज़ ग्रेट .......इथ प्रत्येक जण आपल्या अस्तित्वा साठी प्रयत्नशील असलेला दिसतो..

प्रत्येकाचा स्वार्थच जग सुरळीत चालण्यासाठी उपयोगी पडत असतो... आपण शिरावर घेतलेली आव्हाने, आपला अहंकार , सुप्त लालसा, भौतिक उपभोग घेण्याची मनाची अनिवार इच्छा .....बस एवढ्याच गोष्टी हे महाकाय , भयावह जग सुरळीत पणे चालण्या साठी आवश्यक आहेत....
कुणासाठी कोणतेही उपकार करण्याची गरज नाही वा तसा बढे जाव मारण्याची.

पण येथे एक संधी मात्र आहे ती म्हणजे स्वत: मनात डोका उन पाहण्याची ...तिथेच सर्वात जबरदस्त संधी आहे खरा अनुभव व ज्ञान मिळण्याची... जितके मनास ओळखू तितके आपण सर्व जण अपार आनंदाच्या जवळ जाउ शकतो ..जो कधीही एक क्षण ही कमी असणार नाही .

आपल जड शरीर समजा पृथ्वी तत्व, शरीरातील रस हा जल तत्व, शरीरातील वायू हा वायू तत्व, शरीरातील पोकळी हे आकाश तत्वाचे प्रतीक , व शरीरातील अग्नी हा साक्षात अग्नी तत्वाचे प्रतीक आहे....देवाने दिलेल हे मन अर्थातच सर्वत्र असणार्‍या चैतन्याचे प्रतीक समजले तर अनमोल शरीर हे त्याची सुंदर कलाकारीच ठरली आहे.... म्हणूनच इथे प्रत्येक जनच शक्तिशाली , सुंदर असणार आहे..

म्हणूनच अहंकार सोडून फक्‍त प्रयत्‍न करूयात ही सुन्दरता शोधण्यासाठी...

मुझे मोहोबत सी हो गई है....

मुझे मोहोबत सी हो गई है....

मेरे खायलो मे तेरा ही चेहरा.....


प्रेमाच्या भावनेत कोणी बुडाला नाही अशी व्यक्ती बहुतेक सापडायला कठीणच... आयुष्यातील काही फसव्या वर्षी हे प्रेम नावच फुलपाखरू कधी अलगद येऊन हृदयावर बसत ते आपल आपल्यालाही कलत नाही. आपल पोट न जेवताही भरल्यासारख का वाटू लागत हे पण कलत नाही . नजरेचे बाण झेलायला मनाला घरात बसवत नाही .


तिच्या गल्लीतून हळूच जावस वाटू लागत. तिच्या कॉलेजसामोरचे तर सगळे दुकानदार ओळखीचे झालेले आसतात तिचा गाडीचा नंबर, फोन नंबर, मोबाइल नंबर, क्लास च्या वेळा अचानक लक्षात राहू लागत्. घरात मिस कॉल, ब्लॅंक कॉल चा सिलसिला सुरू झालेला आसतो. आपल्याला वाटत असत की हे सर्व घरातल्य लोकाना समजणारच नाही, पण ते ही आपल्यापेक्षा हुशार निघतात, ते ही कळून न कळल्यासारख करत आसतात .

क्लास जास्त वेळ चालू राहू लागतो, गाडी मधेच बिघडू लागते. ती समोर आली की काय बोलायच, मग ती काय बोलील परत आपण काय बोलायच आशी वेडे पनाच्या संवादाची मालिकाच मनात सुरू होऊ लागते. नुसते बाजून चालत जातानाच छाती जाम धडधडू लागते.


कधी फोन तिने स्वत: उचललाच तर ठरवलेल सगळ विसरून भलताच संवाद होऊन जातो. दिवस दिवस भर नुसता मिस कॉल चा सिलसिला चालू होऊ लागतो, आपला एक तिचा एक, आपले दोन तर परत तिचे आणखी दोन.... टिविवर चांगल गान लागल तरी मिस कॉल द्यायचा... 'शब्देवीन संवादू' या वाक्याचा अर्थ लागलीच कळून जातो व मन तृप्तिच्या झूल्यात झोके घेत आसत.


पहिल्या प्रेमाचा हा सुवास आयुष्यभर दरवळत राहणारच.


मित्राणो वरील सर्व भावना या 7 वर्षापूर्वीच्या आहेत पण मनाला खरी टवटवी आताही देतात..

रीत जगण्याची....

जगात निरनिराळे लोक राहतात, त्यांची जगण्याची व विचार करण्याची पद्धत अलग-अलग आहे. प्रत्येकाची जगण्याची ध्येय व आकर्षने भिन्न आहेत व जीवनविषयक उद्दिष्त्येही वेगवेगळी असणार हे कळले तरी खूपच झाल. कारण त्यामुळे आपण आतापर्यंत ज्या एकसुरी मार्गाने जगत् आलोय त्याची तरी जाणीव होते. आतापर्यंतची आपली ध्येय व उद्दिष्त्ये किती छोटी होती व त्यास कोणतीही चंदेरी झालर नव्हती व किती मीलमिळीत होती याची जाणीव होणे, यातच नंतरच्या संक्रमनाचे बीज होय.

पण मला एक कलत नाही, आपली सर्व ध्येय का विशाल असावित किंवा आगदीच अल्पसंतुष्ट का नसावित? तसेच मानवी जीवनात प्रेम, मैत्री याना तरी आपण का इतक अवास्तव महत्व देतो आलोय? किंवा प्रत्येक गोष्ट निरनिराळे लोक का इतक्या तन्मय्तेन व मन लावून करतात व काही लोक का इतक जिवावर आल्यासारख्या सोप्या गोष्टीही उर्कत असतात? काही व्यक्ती या असीम उर्जेच्या व उत्साहाच्या अखंड उडनार्या करंज्यासारख्या का असतात? तर काही चिखलतल्या डुकरसारख्या का जगात असतात?

खरच का मनुष्य जीवनात येऊन मनासारख जीवन जगायला मिळणे हे एक भाग्य आहे वा मानवी प्रयत्नाचि पराकाष्ठा आहे. नशीब व प्रयत्न यात खरच फरक आहे का व असला तर तो किती? प्रत्येकाच जगण्याच तत्व कस घडत जात, त्याच्या माग कोणत्या गोष्टी तो अनुभवत असतो, अपार दुख: होण्याच किंवा मन कोमेजून जाण्याच काय कारण असेल, किंवा अत्यानंदात सर्व जगाचा विसर कसा काय पडत असेल? हे सर्व आत्म्याचे खेळ पाहून स्वर्गातील देवांचे खरोखरच रंजन होत असेल का? की जीवन जगण्याची खरी रीत कोणालाच उमजली नाही? का आपल्याला जमेल तस फक्त आनंद घेत व दुख: सोसत जगायाच?

जगण्यासाठी खरच का ध्येयाची मृगजळ वा आशेची फळ आवश्यक असतात?

गोड गुपित..

जीवन सुंदर असते, जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत असतात , तेव्हा देव ही नेहमीपेक्षा जास्तच आवडू लागतो.मनातील मोर तर सारखा थुई थुई नाचतच असतो.

अस वाटत की सगळीकडे आनंदाचेच पक्षी उडत आहेत. आपल्या अवतीभोवती वाहणारा वाराही जणू आपल्याच आवडीच गाणे खास 'आपल्यासाठीच' गात आहे अस वाटून जात. मनालाही उत्साहाच इतक भरत येत की आपलच आपल्याला आश्चर्य वाटू लागत.

काही जादू झालेली असते का तेव्हा? की आपल्यातच एखादी नवी शक्ति संचारलेली असते? काय गुपित काय असत या मागे, जरा विचार केलाय का कधी,

मित्राणो इथेच तर खरी गंमत आहे बर का.......कारण जेव्हा आनंदाचा झरा वाहू लागतो तेव्हा आधीच्या बर्‍या-वाईट गोष्टी मन सहजपणे विसरून जाते. व वर उल्लेख केलेल्या गोष्टींबद्दल आपल्या मनात कोणताही विचार येत नाही कारण मिळणारा आनंद Blindly एन्जॉय करत असतो आपण फक्त......

जेव्हा काही कारणाने आपण थोडे दुखी होतो तेव्हा आपणच या आनंदाच्या झर्यातल पाणी, नसता विचार करत राहून गढूळ करत बसतो नाही का...

मला इथे एवढाच सांगायाच आहे की , आनंद मिळत असताना तो आनंद आपणास का मिळत आहे याचा जसा आपण विचार करत नाही, तसाच दुखी झालो तरी अधिक विचार करन्याने दुखाची तीव्रता आपणच वाढवत बसायच का?

माझा पहिला ब्लॉग...

आपण ब्लॉग का बनवतो? मनातल काही सांगण्यासाठीच ना...पण एकदम personal तरी कस सांगायाच तुम्हाला.. काही ओळख ना पालख.

आता डोक उखळात घुसवलयच तर घावासणी का घाबरायाच.....करतो यत्न थोडा थोडा....आधूनमधून भेट देत जावा रसिकानो, तेवडच जिवाला माझ्या बर वाटल. आणि काय बर वाईट सांगायाच आसल तर खुषीने सांगत बी जावा...

या ब्लॉगावर माझ्या मनातल सार सार सुचलेल , इचार, कल्पना ,आनुभव यांची कोल्हापुरी मिसळ बी आसल...आन् बर का पावन मिसळ टेस्ट करताय पर ठसका बी लय जबरी आसतुया ....नाय आदुगारच सांगून ठेवतो.......