गुरुवार, १६ जून, २०११

हो / नाही

खरच हा महाकाय भ्रष्टाचार आटोक्यात येणार आहे कि नाही .... सोप उत्तर तर नाही म्हणून सहज देऊ शकू आपण ... कोणत्याही व्यक्तीला second income सुखावहच वाटत ...त्यात त्याला थोडी बहादुरी केल्यासारख वाटत व माणसाच्या मुलभूत गुणधर्माप्रमाणे समाधान ही मिळून जात ... फक्त ते तात्पुरत असत ...

सरकारी यंत्रणाच नव्हे तर खाजगी क्षेत्रही भ्रष्टाचार करण्यात मागे नाही .... मोठ मोठी कामे निविदांच्या मार्गाने जरी पूर्ण होत असली तरी उच्च पातळीवर पैशांच्या खूप मोठ्या उलाढाली झाल्यामुळेच .. व्हाईट कॉलर लोकांना त्यांच्या त्यांच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळत असते ..हे मात्र आपण सहज नजरेआड करत असतो ...

समजा कल्पनेत भ्रष्टाचार मिटला अस समजलं तर ज्या सेवा आपण सरकार कडून सद्या घेत आहोत त्यांचे मूल्य हे आताच्या बाजारभावाप्रमाणे सरकारला देणे लोकांच्या एकतर खूप आवाक्याबाहेर असेल .... आणि कागदपत्रांची पूर्तता करता करता पुरती दमछाक होऊन जाईल ...

म्हणूनच थोड्याशा चीरीमिरीत आपली शुल्लक कामे होत असतील तर सामान्य लोकांचा भ्रष्टाचाराला सहाय्य करण्यास कधीच विरोध नसतो ...

आता प्रसिद्धीसाठी काही चतुर लोक सरकारशी पंगा घेत असतील तर सरकार एवढ पण खूळ नाही कि कोणाच बोलण कितपत मानायचं .. एवढे मोठ मोठे राजकारणी ...उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकारी आजून सेवेत आहेत म्हणूनच हा १२० कोटी जनतेचा गाडा निर्धोक पणे चालविला जातोय ..