रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

नाद ब्रम्ह...

ध्वनी लहरी अर्थात आवाज निर्माण करण्यासाठी कोणत्याही दोन गोष्टींची आवश्यकता आसते... टाळी दोन हाताने वाजवली जाते, कोणतेही वाद्य वाजवले जात असताना त्याच्या तारांचा बोटाने किंवा प्लेक च्या साहयाने झन्कार केला जातो.... ही झाली काही मूलभूत उदाहरणे....

या सृष्टीत नेहमीच काही आनोख्या घटना घडत असतात, ज्या थोडे सजग पने लक्ष्य दिले असता दिव्य वाटू लागतात...

आपली सृष्टी ही सतत, दिवस-रात्र, बारा महिने चोवीस काळ एक सारखा नाद करत असते. ज्या साठी कोणत्याही नैसर्गिक वा कृत्रिम गोष्टीची गरज नसते..

आताच्या धावपळीच्या युगात तस तर या गोष्टीला काहीच महत्व नाही... इथे स्वत: च्या मनातल एइकायला कोणाला वेळ नाही, मग या नस्त्या उचपती कोण करणार.... असो.

महत्वाचा उद्देश हाच आहे की, आपणास ही, हा आवाज ऐकू येऊ सकतो, थोड्याशा प्रयत्नाने, रात्री झोप लागण्या पुर्वी या आवाजावर लक्ष केंद्रित केले असता तत्काळ झोप लागते ही झाली फायद्याची गोष्ट....
पण आपले मन जेव्हा जेव्हा सैरभैर होत असते... बैचेन होत असते तेव्हा तेव्हा हा आवाज आपलाच वाटू शकतो... या आवाजाचा अदृश्य धागा मनाला शांति प्रदान करून जात असतो....

प्राचीन ऋषि मूनिना हा अनाहत नाद माहीत झालाच होता... आणि म्हणूनच त्याचे दृष्य स्वरुप म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा पुज्य व पवित्र असा ''ओंकार'' होय..

हा 'अनाहत नाद' आताचे सो कॉल्ड योगगुरू आपणास फक्त गळ्यातुन काढायला शिकवतात.... आणि आपण फक्त आन्धळे पनाने त्याचे अनुकरण करत आलो आहे...

मला इथे एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, आपल्याला देवाने जी द्यानेंद्रिये दिली आहेत ती सर्व आपण कंट्रोल करू शकतो फक्त अपवाद एक, तो म्हणजे आपला 'कान' होय....

पाहायचे की नाही, स्पर्श करायचा की नाही, चव घ्यायची की नाही, वास घ्यायचा की नाही हे आपण सहज वा थोड्या प्रयत्नाने कंट्रोल करू शकतो...... परंतु आवाज स्वीकारायचा की नाही हे नैसर्गिक पने कंट्रोल करू शकत नाही.... कोणताही आवाज येऊ दे, तो तर आपणास स्वीकारावाच लागतो....

हा वरील रेफरेन्स इतक्याच साठी की, सृष्टीचीच ही नैसर्गिक रचना अशी आहे की, आपण तिला कोणत्याही अडथळ्या शिवाय ऐकावे....

हा नाद थोडे प्रयत्न केले असता ऐकू येऊ शकतो हे तर वर सांगितले आहेच... काही ओळखीच्या खुणा म्हणजे 'ओम' हा ध्वनी त्या आवाजाचे दृष्य रूप सर्वाना परिचित आहे, अजुन जवळची खूण म्हणजे 'सू' असा आवाज येऊ लागणे हा होय.... लाइट गेल्यावर सगळीकडे एकदम शांतता होऊन जाते त्या क्षणाला त्याची झलक मिळायची शक्यता थोडी जास्त...

'ओम' या पवित्रा ध्वनीस भारतीय संस्कृती 'अक्षर ब्रम्ह' असे मानते... ज्याचा कधीही क्षर होऊ शकत नाही असे तत्व... म्हणजे साक्षात ईश्वर होय... याचाच नाद रूपात आपण अनुभव घेऊ शकतो... व यालाच नाद ब्रम्ह असे म्हणतात....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: